महाराष्ट्र राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज ऑनलाईन घ्यावेत की ऑफलाईन याचा निर्णय अजून पर्यंत झालेला नाही. आज संध्याकाळी ४ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी, कुलगुरू आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे.
महाविद्यालय सुरु राहणार का नाही हा निर्णय आज संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. उदय सामंत यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कॉलेज ऑनलाईन राहणार का ऑफलाईन याचा निर्णय घेणार आहेत. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण चालू होणार आहे.
लॉकडाऊन होणार की नाही यासंदर्भात बैठकीला अनेक अधिकारी उपस्थित होते. विद्यापीठे आणि महाविद्यालये उघडी राहणार की नाही याचा निर्णय किती जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे यावरून होणार आहे. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधानसचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.
आज सर्व विभागीयआयुक्त,राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक ऑनलाईन पार पडली,कोविड19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला,विद्यार्थीं, पालक,प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षितते बद्दल चर्चा झाली. ह्या संदर्भात निर्णय उद्या सायं. 4.00 वाजता जाहीर करू.
— Uday Samant (@samant_uday) January 4, 2022
महाविद्यालये आणि विद्यापीठे स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठकीला राज्यातील 33 जिल्हाधिकारी, 6 विभागीय आयुक्त, आणि 13 कुलगुरू बैठकीला उपस्थित होते. बुधवारी महाविद्यालये चालू राहणार की ऑफलाईन चालू होणार हे कळणार आहे.