सध्या देशात पारंपरिक (Traditional farming) शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि आता यासोबतच शेतकरी नगदी पिकांची आणि औषधी (Medicine) वनस्पतींची देखील लागवड करताना दिसत आहेत. बांबू देखील फायदेशीर वनस्पती आहे. यामुळे शेतकरी (Farmer) बांबू च्या शेतीची लागवड करत आहेत. आणि यासाठी सरकार ५० टक्के सबसिडी देतं आहे.
बांबूची (Bamboo) जर एकदा लागवड केली तर त्यापासून ४० वर्ष शेतकरी उत्पादन घेऊ शकतो. बांबूची मागणी आंतरराष्ट्रीय (International) बाजारात केली जाते त्यामुळे सरकार या शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करते. बांबू पासून कागद (Paper) आणि कार्बनिक कपडेदेखील बनवले जातात. आणि या गोष्टी बाजारात (Market) सतत लागत असतात त्यामुळे बांबू शेतीला चांगले प्राधान्य निर्माण झाले आहे.
यापद्धतीने बांबूची लागवड (Planting) केली जाते
१) बियाणे पेरून
२) कलम पद्धतींने
३) रायझोम पद्धतीने
बांबूच्या रोपाची (seedlings) किंमत ही त्या रोपाच्या जातीवर अवलंबून असते. या लागवडीसाठी विशेष अस काही केलं जातं नाही नांगरणी करून देखील याची लागवड करता येते. यामध्ये एका एकरात १०० बांबूची रोपे लावता येतात. बांबू साठी भारतातील वातावरण (Atmosphere) चांगले पोषक आहे. फक्त काश्मीर सोडून सर्व भागात बांबूची लागवड ककरता येते. बांबूची लागवड करताना जर जमिनीचा पीएच ५ ते ६ दरम्यान असल्यास बांबूचे यशस्वीरीत्या उत्पादन (Production) घेतले जाऊ शकते. बांबू लागवड करताना वाळू युक्त माती असलेल्या जमिनीमध्ये करू नये असे सांगितले जाते.