राजकीय भूमिका मांडली म्हणून अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेली मालिका मुलगी झाली हो मधून काढण्यात आलं. तर सेटवरच्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढलं असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.
आता राज्य महिला आयोग किरण माने यांच्या मदतीला धावला असून मालिकेतून त्यांना का काढून टाकण्यात आलं याबाबतचा लेखी खुलासा आयोगास सादर करण्याचे निर्देश मालिका निर्मात्यांना देण्यात आले आहेत.
किरण माने यांना मालिकेतून काढल्याने कुटुंब आर्थिक संकटात आहे तसंच मानसिक ताणतणावांना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने राज्य महिला आयोगाकडे केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली आहे.
राज्य महिला आयोगाने निर्मात्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता विविध माध्यमांवर आपल्या वैचारिक भूमिका मांडतात.
स्टार प्रवाह या वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता विविध माध्यमांवर आपल्या वैचारिक भूमिका मांडतात या कारणामुळे या मालिकेतून काढून टाकलं असून मालिका निर्मात्याच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे(1/3) pic.twitter.com/3gL8YRRQn4
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) January 17, 2022
या कारणामुळे या मालिकेतून काढून टाकलं असून मालिका निर्मात्याच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे
कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी आहे, असं देखील महिला आयोगाने म्हटलं आहे.