महाराष्ट्रात तेलबियामध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल (Sunflower) या पिकाचा जवळजवळ ७0 टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. खरीप हंगामात (Kharif season) उशिरा पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून सूर्यफुलास प्राधान्य दिले जाते.
सूर्यफूल लागवड (Planting) करताना या गोष्टींचे करा व्यवस्थापन-
सूर्यफूलाची उत्पादकता वाढविण्यासाठी पूर्वमशागत, योग्य जमिनीची निवड, सूर्यफूलाच्या सुधारित व संकरित जातीचा वापर, वेळेवर पेरणी, प्रतिहेक्टरी बियाणे वापर, पेरणी अंतर, संतुलित खते, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत (Intercropping), कीड व रोग या सर्व गोष्टींची काळजी घेतल्याने सूर्यफूल उत्पादनात होते वाढ.
सूर्यफूल हे तिनही हंगामात घेतले जाणारे पीक आहे. ज्या पद्धनीने आपल्याकडे पाण्याची (water) उपलब्धता असेल त्या पद्धतीने सूर्यफूल लागवड करावी. चांगले उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित आणि संकरित जातीचे बियाणे योग्य पप्रमाणात वापरावे.
यापद्धतीने करा खातव्यवस्थापन…
सूर्यफुलाचे पीक हे रासायनिक खतांना (Chemical fertilizer) चांगला प्रतिसाद देत असल्याने संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सूर्यफुलास नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सल्फर या अन्नद्रव्यांची गरज आहे.
पेरणीपूर्वी वापरा ही तणनाशके (Weed killers)-
ट्रायफ्लुरॅलीन ०.५ ते १ किलो क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी पाण्यातून फवारावे.
पेरणीनंतर वापरा ही तणनाशके-
पेंडीमेथिलीन ३0 टक्के ईसी o.७५ ते १ किलो क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी किंवा अलॅक्लोर १ ते १.५ किलो क्रियाशील घटक यापैकी एकाची ५०० लिटर (Liter) पाण्यातून पेरणीनंतर पीक उगवणी अगोदर फवारणी घ्यावी व त्यानंतर गरजेनुसार २५ ते ३० दिवसांनी खुरपणी (Weeding) किंवा कोळपणी करुन पीक तणविरहित ठेवावे.