नवी दिल्ली | निवडणुका या लोकशाही व्यवस्थेतील सर्वात मोठा उत्सव असतात. आत्ताच देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. पाचपैकी चार राज्यात सत्ता राखण्यात भाजपला यश आलं आहे.
देवेंद्र फडणवीसांचं मुंबईत स्वागत झाल्यानंतर फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.परिणामी राज्यात आता शिवसेना-भाजप वाद रंगला आहे. नील सोमय्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारनं नील सोमय्यांची कुठलीही चौकशी करत नसल्याचं सांगितलं.
उच्च न्यायालयात ठाकरे सरकारनं स्वत:ची इज्जत घालवून घेतली असा टोला भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेला लगावला.
किरीट सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला ते म्हणाले की, संजय राऊत यांनी नील सोमय्यांविरोधात दिलेल्या कागदपत्रांचे पुढे काय झाले? हायकोर्टाने ठाकरे सरकारला लोटांगण घालावे लागेल नीलवर तुम्ही जो अत्याचार केला त्याचा हिशोब सोमय्या नक्की घेणार असा इशारा ही त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नील सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशी मुंबई पोलीस करणार असल्याचं ते म्हणाले. इतकेच नाही तर बाप-बेटा जेलमध्ये जाणार असल्याचंही राऊतांनी दावा केला होता.
शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी वाधवान आणि सोमय्यांच्या संबंधांच्या तारखा मांडल्या. सोमय्या यांनी जून २०१५ मध्ये एचडीआयएल आणि जीव्हीके कंपनीने मुंबई विमानतळाची ६३ एकर जमीन हडपल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा. पुण्यात शिवसेनेनं ७७ गुंड मला मारण्यासाठी पाठवले त्यातील ३० मुंबईतले होते असा आरोपही सोमय्यांनी केला.