सध्या भोंग्याच्या वादावरून राजकीय वातावरण तापले असतानाच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. भोंगा खालीवर करून आपली भूक भागणार आहे का? हनुमान चालिसा म्हणून बजरंगबली आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ भाकर खाऊ घालणार आहे का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
एका कार्यक्रमात बोलत असताना धनंजय मुंडे म्हणाले आहेत की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत माणसे मरण्या अगोदर त्यांची माणूसकी मेली होती. आमच्या सारखे नव्याने झालेले आमदार, मंत्री जनतेसाठी काम करत होते. मी अनुभवाचेच सांगतो. पहिल्या लाटेत मलाही कोरोना झाला. रात्री तपासणी झाली. रात्री उशिरा रिपोर्ट आला, कळलं मी पॉझिटिव्ह आलो. त्रास व्हायला लागला.
मी माझ्या ड्रायव्हर व जवळच्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीला फोन केला. दवाखान्यात जाण्यासाठी वाहन आणायला सांगितले. माणुसकी मेल्याचे जिवंत उदाहरण माझे सांगतो. माझे दोन्ही माणसांनी येण्यास नकार दिला. पुढे त्यांनी सांगितले, दुसऱ्या लाटेत माणसं गेली. माणसं जात असताना माणुसकी जिवंत असलेली दिली. जवळचे मित्र, नातेवाईक रुग्णाला हाताला धरून रुग्णालयात घेऊन जाताना दिसले.
मागील वर्षी याच महिन्यात ऑक्सिजन व बेडसाठी आटापिटा सुरू होता. आता वेगळा घोर लागला आहे. आता वेगळा घोर लागला आहे. कोणाला भोंगे लावणं, कुणाला उठवणं, कोणी हनुमान चालिसा वाचेल. कोण घरात वाचणार की कोणाच्या दारात वाचणार. कुणाला वाचता येत असेल नसेल माहिती नाही मात्र वातावरण एवढं तापवलयं की डोक्यातून कोविडचं खुळ गेलं.
यानंतर त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर बोलताना, “कुठला भोंगा खालीवर करून आपली भूक भागणार आहे का? हनुमान चालिसा म्हणून बजरंगबली आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ भाकर खाऊ घालणार आहे का? इंधन दरवाढ झाल्याचे अजूनही कळेना. आम्ही एकीकडे जनतेला कष्ट पडू नये म्हणून प्रयत्न करतोय तर दुसरीकडे ते जातीपाती धर्माचे राजकारण करत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात धर्माचे जातीपातीचे राजकारण जनता सहन करणार नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.
महत्वाच्या बातम्या
एका प्रकरणातून सुटका होताच दुसऱ्या प्रकरणात जिग्नेश मेवानींना अटक, पंतप्रधानांविरोधात केले होते वादग्रस्त वक्तव्य
“अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशातील फडावरचा नाच्या..” सदाभाऊ खोत यांची जहरी टीका
लखीमपुर हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राने केले सरेंडर, उच्च न्यायालयाने दिला होता जामीन