मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.
संभाजीराजे छत्रपतींच्या निमित्ताने चार भिंतीआडून खोटे कोण बोलतो हे उघड झाल्याची टीका त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. निवडणुकीसाठी त्यांनी पक्षप्रवेशाची अट कायम ठेवली.
शिवसेनेबद्दल माझ्या मनात कोणताही द्वेष नसून मला कोणत्याही बंधनात अडकायचे नाही. ही माझी माघार नसून माझा स्वाभिमान असल्याचे मत संभाजी राजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मांडले.
यावर अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली. “संभाजीराजे छत्रपतींच्या निमित्ताने चार भिंतीआडून खोटे कोण बोलतोय, हे उघड झाली आहे. आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा वचन दिले होते, म्हणून केंद्रीय अमित शहांना खोटे पाडणारे आज पुरते उघडे पडले आहेत “, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.