औरंगाबाद : नुकताच यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना यात यश मिळाले आहे. राज्य राखीव दलाचे अप्पर पोलीस चिरंजीव प्रसाद यांचा मुलगा रामेंद्र प्रसाद यांनी देशात 181 वा क्रमांक पटकावला आहे.
रामेंद्र यांनी आय आय टी, खरगपूर येथून अभियांत्रिकी पदवी घेतली. ‘हाउसिंग डॉट कॉम’ या वेब पोर्टलमध्ये त्यांनी दीड वर्षे नोकरी केली. ‘संस्कृत’ हा एछिक विषय घेऊन युपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. यूपीएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर रामेंद्र यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझे वडील आयपीएस, आई युपीएससी पास असल्यामुळे आपणही आयपीएस पास व्हायचं, असं लहानपणीच मनाशी पक्कं ठरवलं होतं.
सर्वप्रथम मी पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत एक वर्ष नोकरी केली. हातात वार्षिक १८ लाखांचे पॅकेज असुनही आयपीएस होण्याचं स्वप्न असल्याने नोकरी सोडून दिली. आश्रमात अध्यात्मिक आणि शांत वातावरणात अभ्यास करण्याचे ठरवले. त्यामुळे नोकरी सोडल्यानंतर जालन्यातील दत्त आश्रम गाठले. असल्याचे रामेंद्र यांनी सांगितले.
सर्वात प्रथम मित्र मंडळी, कुटुंब आणि सोशल मीडियासारख्या आकर्षक गोष्टींपासून स्वतः ला लांब केले.तीन वर्षांच्या मेहनतीनं तर आज या ठिकाणी पोहोचलो आहे. त्यामुळे मीसुद्धा वडिलांसारखा आयपीएस होणार असल्याचा मला गर्व आहे. त्याचबरोबर मी भविष्यात आश्रमातील अन्नदान आणि सेवाभाव करणार असल्याचे मत रामेंद्र यांनी व्यक्त केले.