राज्यात नुकत्याच राज्यसभा निवडणुका पार पडल्या. यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला जबर धक्का दिला आहे.
यामुळे दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टिका करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
“भाजपने ही निवडणूक केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरावर जिंकली आहे. तसेच आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे. कोणत्याही अपक्षाचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, त्यामुळे आमच्या हातात केवळ ED द्या आणि मग बघा” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय.
तसेच, “पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे” असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.