शनिवारी रात्री आसाममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 32 जिल्ह्यातील 37 लाखाहून अधिक लोक बाधित झाले आहेत. आसाममध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. सध्या आपत्ती व्यवस्थापक येथील परिस्थितीचा पूर्ण आढावा घेत आहेत.
आसाममध्ये शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वकाही उद्ध्वस्त होऊन बसले आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी गेल्यावर सर्वकाही उद्ध्वस्त झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आसाममध्ये पूर आणि भूस्खलनात एकूण 70 जणांचा मृत्यू झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील ३२ जिल्ह्यांत चार हजार ४६२ गावांमधील ३७ लाख १७ हजार ८०० हून अधिक लोकांना पुराचा फाटका बसला आहे. याठिकाणी पूरग्रस्तांना आश्रय देण्यासाठी उभारण्यात आलेल्या मदत-निवारा छावण्यांत एक लाख ५६ हजार लोकांनी आश्रय घेतला आहे.
दरम्यान आसाममधील नागरिकांना वाचविण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा राबविण्यात येत आहे. अद्याप बचाव यंत्रणेकडून पुरात मृत्यू झालेल्या नागरिकांना ठोस आकडा सांगण्यात आलेला नाही. सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोचवण्याचे प्रयत्न सुरू आहे.