राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सध्या या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. त्यामुळे न्यायालय आता कोणाच्या बाजूने निकाल देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
नुकताच न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. त्यानुसार उद्या, बहुमत चाचणी होणारच असे न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने निकाल न देता राज्यपालांच्या आदेशाला मंजुरी दिली आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
तिन्ही पक्षांचा युक्तिवाद संपल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला. यावेळी न्यायालयाने उद्याची बहुमत चाचणी रद्द करता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे आता उद्या महाविकास आघाडीला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. उद्याच्या बहुमत चाचणीत महाविकास आघाडी सरकारच्या हाती अपयश आले तर ठाकरे सरकार बरखास्त होऊ शकते.