शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केली. यावेळी किल्ले जिंकून घेण्यासाठी त्यांना परकीयांसोबत तर कधी स्वकीयांसोबत सुद्धा युद्धे करावी लागली. युद्धाच्या वेळी सैन्य आणि शस्त्रांना जितके महत्त्व होते तितकेच महत्त्व रोख रक्कमेला होते. युद्ध यशस्वी करण्यासाठी मोठी रोकड ( cash) सोबत असणे गरजेचे होते. यासाठी बऱ्याचदा सावकारांकडून रोकड घेतली जायची. बारामतीमधील गणेश नाईक ( Ganesh Naik) हे सावकार पेशव्यांना युद्धासाठी पैसे पुरवायचे.
पेशवाई काळात असे पैसे पुरवले गेले
शिवाजी महाराजांनंतर पेशव्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा अवलंब आपल्या कामात केला. यावेळी युद्धाच्या वेळी आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी त्यांनी बारामतीचे गणेश नाईक यांची निवड केली होती. बारामतीचे गणेश नाईक हे त्या भागातील सावकार होते. सावकारकी पिढ्यांनपिढ्या त्यांच्या घरात सुरू होती.
पेशवे काळात युद्धासाठी पैसे पुरवण्यात गणेश नाईक यांचा पुढाकार होता. इतकेच नाही तर शाहू महाराजांच्या काळात सुद्धा गणेश नाईकांनी आर्थिक मदत ( Econamical help) केली होती. गणेश नाईक यांचे भाऊ कृष्णा नाईक हे देखील युद्धासाठी आर्थिक मदत करायचे.
नाईक पेशवे यांचे ‘असे’ नातेसंबंध होते
सावकारी हा नाईक कुटुंबाचा मूळ व्यवसाय होता. त्यांचा राज्यावर असलेला आर्थिक दबदबा व राज्याला नाईकांची असणारी गरज ओळखून पेशव्यांनी नाईक घरात त्यांच्या बहिणीसाठी विवाह प्रस्ताव पाठवला होता. नाईकांना देखील हा प्रस्ताव आवडला व बाजीराव पेशव्यांची बहीण गणेश नाईकांच्या घरी लग्न करून बारामतीची ( Baramati City) सून झाली.