इंधनाची दरवाढ सतत होत असते. यामुळे निश्चितच सर्वांचा प्रवास महागतो. गरीब असो किंवा श्रीमंत इंधन दरवाढीची झळ सगळ्यांनाच लागते. 1973 मध्ये अशीच झळ जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी ( Atal Bihari Vajpeyi) यांना लागली होती. यामुळे त्यांनी अधिवेशनात जाताना चक्क गाडीऐवजी बैल गाडीने गेले होते.
सरकार विरोधी जनमत तयार करण्यासाठी वापरली ‘ही’ भन्नाट कल्पना.
इंदिरा गांधी ( Indira Gandhi) पंतप्रधान होत्या त्या काळात तेलाच्या किंमती वाढविण्यात आल्या होत्या. यावेळी नोव्हेंबर 1973 च्या अधिवेशनात वाढत्या तेलांच्या किंमतीवरून सरकारविरोधात जनमत तयार करण्याचे विरोधी पक्षाने ठरविले होते.
इंधन वाढीला विरोध दर्शविण्यासाठी जनसंघाचे प्रमुख नेते अटलबिहारी वाजपेयी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बैलगाडीतून पोहोचले. तर काही खासदार सायकलीवरून आले. याची दखल ‘न्यूयॉर्क टाईम्स'(Newyork Times) ने सुद्धा घेतली होती.
म्हणून पेट्रोल दरवाढ करण्यात आली होती
1973 मध्ये जगभरात तेलाचा पुरवठा करणाऱ्या ओपेक संघटनेने जगभरातील तेलाचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे भारतात होणारा तेलाचा पुरवठा कमी झाला आणि भारताला तेल संकटाचा सामना करावा लागला. यावेळी इंदिरा गांधी यांनी तेलाच्या किंमती जवळपास 80 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.