भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधू हिने राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेल ली हिचा पराभव करत सिंधूने बॅटमिंटन महिला एकेरी स्पर्धेत ही कामगिरी केली आहे.
उंपात्य फेरीत सिंधूने सिंगापुरच्या जिया मिन येओशी हिचा पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. या धर्तीवर आज झाालेल्या अंतिम सामन्यात सिंधूने बाजी मारली आहे.
या सामन्यात सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली हिचा २१-१५, २१-१३ असा सलग दोन सेटमध्ये पराभव केलाय. यामुळे संपुर्ण देशभरातून सध्या सिंधूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, सिंधू दुसऱ्यांना राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचली आहे, तर राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. सिंंधूच्या पदकासह भारताने आतापर्यंत १९ सुवर्णपदक मिळवली आहेत.