राज्यात सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाषण करत असताना सत्ताधारी पक्षातील काही आमदारांचा गोंधळ ऐकून ‘अजित दादा स्टाईल’ मध्ये “तुलाच फार कळतय का ?” असे म्हणत शाळा घेतली. विधानसभेत अर्थ खात्याच्या पुरवणी मागण्यांवर अजित पवार ( Ajit Pawar) बोलत असताना हा प्रसंग घडला.
काय म्हणाले अजित पवार ? अर्थ खात्याच्या मागण्यांवर बोलत असताना सत्ताधारी पक्षातील गोंधळ ऐकून अजित पवार म्हणाले की, “मगाशीच तुम्हाला म्हटलंय जे बोलायचं ते उठून बोला. थांब बाबा, तुलाच फार कळतंय का, आम्ही इथं गोट्या खेळायला आलोय का? असा संतापून सवाल केला.
गेल्यावर्षी ४ कोटी आमदार निधी केला. त्यानंतर यंदा अर्थसंकल्पात ५ कोटी आमदार निधी केला. अर्थमंत्री असताना हा शिवसेना, भाजपाचा, अपक्ष, बच्चू कडूंच्या प्रहारचा असा कुठलाही भेदभाव मी केला नाही.”
शिंदे गटाकडून आरोप विधिमंडळाच्या या अधिवेशनात ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी वाटप करताना शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला जात नव्हता. जास्त निधी राष्ट्रवादीच्या ( NCP) आमदारांना मिळायचा कारण त्यांच्याकडे अर्थ खाते होते.’ असा आरोप शिंदे गटातील नेत्यांनी केला.
फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवावा यावर अजित पवारांनी संतापून उत्तर दिले. देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. २५-१५ निधीची सुपीक कल्पना नेत्यांच्या डोक्यात आली. त्याचा वापरही मीदेखील मोठ्या प्रमाणात केला.
२५-१५ निधी देताना आम्ही महाविकास आघाडीच्या आमदारांना ५-५ कोटींचा निधी दिला हे आम्ही मान्य करतो. परंतु त्याचवेळेस तुमच्याकडून याद्या घेऊन तुमच्याही आमदारांना २-२ कोटींचा निधी दिला. २ कोटी दिले नाहीत १ कोटी दिले गेले. असेही अजित पवार म्हणाले.