आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आशिया कप ही स्पर्धा महत्वाची मानली जात आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तान संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
२८ तारखेला आशिया कपमधील सर्वात महत्वाचा असा भारत पाकिस्तान सामना पार पडला. यात भूवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने पाकिस्तानावर ५ विकेट्सने विजय मिळवला. या धर्तीवर आज भारताचा दुसरा सामना हॉंगकॉंग सोबत होणार आहे.
पहिल्या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतला संधी देण्यात आली नव्हती, यामुळे आजच्या सामन्यात पंतला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पहिल्या सामन्यात शुन्यावर बाद झालेल्या केएल राहूलवर देखील सर्वांचे लक्ष असेल.
दरम्यान, आजच्या सामन्यात संघात बदल होण्याची शक्यता असल्याचे कर्णधार रोहित शर्माने सांगितले आहे. यामुळे आजच्या सामन्यात भारताचा अनुभवी फिरकीपटू आर.अश्विन आणि रवी बिश्नोई यांना संधी मिळू शकते.